शिंदेंच्या निर्णयाला ठाकरेंचे तात्काळ उत्तर; उमेदवारीची घोषणा करत दिले प्रत्युत्तर
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने कृपाल तुमाने यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. महायुतीकडून हे पद शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला देण्यात आले असून, त्यानंतर तुमाने यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.
दरम्यान, या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) देखील सक्रिय झाली असून, पक्षाने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आता राजकीय चुरस वाढण्याची शक्यता आहे.विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने अखेर कृपाल तुमाने यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. संख्याबळाच्या आधारे महायुतीने हे पद शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला दिले असून, उमेदवारी निश्चित करण्यापूर्वी पक्षांतर्गत मोठी चर्चा आणि चुरस पाहायला मिळाली.
दरम्यान, उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील काही वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम देत कृपाल तुमाने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.मात्र, शिंदे गटाकडून उमेदवाराची घोषणा होताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) देखील मैदानात उतरला. ठाकरे गटाने जगन्नाथ अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्यामुळे उपसभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. आता या पदासाठी थेट राजकीय सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) कडून जगन्नाथ अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांची थेट लढत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्याशी होणार आहे. संख्याबळाचा विचार करता महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने शिंदे गटाचे पारडे जड मानले जात आहे.
सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ठाकरे गटाने उमेदवार रिंगणात उतरवत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय रंगत वाढली आहे.दरम्यान, शिवसेनेतील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटाची वाट धरल्याची चर्चा असून, या घडामोडींना ‘ऑपरेशन टायगर’शी जोडून पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटातील काही आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
खासदारांच्या संभाव्य फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती सावरण्यासाठी मातोश्रीवर बैठका घेतल्या. तसेच, बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत त्यांनी त्यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. या दौऱ्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्यावरही टीकेची झोड उठवण्यात आली.
ठाकरे यांच्या या दौऱ्यात शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत हे देखील सहभागी होते. दोन्ही नेत्यांनी बंडखोरी करणाऱ्या खासदारांवर कठोर शब्दांत टीका करत पक्षनिष्ठेचा मुद्दा उपस्थित केला.